माहूर तालूक्यात दमदार पाऊस न झाल्याने शेतक-याचे आकाशाकडे डोळे -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। हरणाच्या बेंबित मनमोहक, सुगंधीत कस्तुरी असते मात्र तिचा सुगंध तिलाच घेता येत नाही. 'खाकेत कळसा गावाला वळसा' या म्हणीप्रमाणे सुगंधासाठी ती सारा जंगल पिंजून काढते असे सांगितले जाते. अशीच स्थिती दिसुन येत असुन मृगाच्या कस्तुरीचा सुगंध शेतकऱ्यांना घेता येईल काय? अशी चर्चा शेतकऱ्यामधून केली जात आहे.
निसर्गाच्या तीन ऋतूमध्ये आणि २७ नक्षत्रांच्या तुलनेत मृग नक्षत्र हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा नक्षत्र आहे. मृग नक्षत्रापासूनच पावसाला सुरुवात होत असून, याच नक्षत्रावरून शेतीची दिशा आणि दशा ठरत असते. आदिवासी बहुल उद्योगविरहित माहूर तालुक्यात ऐकमेव शेती केली जाते. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन यावर्षीच्या खरीप हंगामाला जोमाने सुरुवात करण्यात आली असून, रोहिणी नक्षत्राच्या अगोदरच शेतकऱ्यांची शेतीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली.
आहेत. ७ जून पासून मृग नक्षत्राला सुरुवात...
