Journalist mahur : नारळी पौर्णिमा यात्रा नियोजन बैठकीत पत्रकारांना डावलले! स्थानिक पत्रकारात नाराजीचा सूर
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| गडावर दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या यात्रे संदर्भात उद्या दि, २८ जूलै रोजी नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी गडावर होणार्या प्रमुख यात्रा नियोजन बैठकीस पत्रकारांना आमंत्रित करण्यात येत असते परंतु महसूल विभागाने निर्गमित केलेल्या अधिकृत पत्रात पत्रकारांना बैठकी साठी बोलविण्याचे टाळल्या ने स्थानिक पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दतशिखर संस्थान येथिल परीक्रमा नारळी पौर्णिमा यात्रा ही दि ७ ते १० ऑगस्ट दरम्यान साजरी होणार आहे, त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाने दि २४ जुलै रोजी यात्रा आढावा नियोजन बैठकीच्या अनुषंगाने पत्र काढले त्यात पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महावितरण, एस टी महामंडळ, यासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले मात्र यात प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना हेतुपुरस्पर डावलण्यात आले आहे,वास्...
