Ardhapur Taluka Congress : राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा – अर्धापूर तालुका काँग्रेसची मागणी
नांदेड| यावर्षीच्या खरिप हंगामात झालेल्या सतत अतिवृष्टीमुळे सतत पुराने थैमान घातले पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले आहे.सर्वत्र शेती व पिके जलमय झाले.जमिनी रखडल्याने पुढच्या कांहीं वर्षे पिक येणार नाही अशी परिस्थिती झाली आहे अतोनात नुकसान झाले आहे.अश्या संकटात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा.व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या धर्तीवर सरसकट नुकसान भरपाई द्यावी, सरसकट पिक विमा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,केळीचे नुकसान झाले त्यांनी सोयाबीन पेरणी केली तेही पेरणी गेली त्यांचे नावे नोंदवून घ्यावी तसेच शक्ती पीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने आज रोजी बुधवारी अर्धापूर तहसीलदार यांच्या मार्फत राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
कॉंग्रेस पक्ष्याच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष तिरुपती उर्फ पपू पाटील कोंढेकर, अर्धापूर तालुकाध्यक्ष सुनील वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात...
