मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांनाही प्रति महिना ५००० रु. पेन्शन देण्याचा निर्णय घ्या – ॲड रेवण भोसले -NNL
धाराशिव/उस्मानाबाद | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील ६० वर्षावरील प्रत्येक शेतकऱ्यांना दरमहा किमान ५ हजार रुपये पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मंदिर, मज्जिद, चर्च बांधण्यात कसलेही स्वारस्य नसून कर्जबाजारीपणामुळे दिवसेंदिवस होत असलेल्या आत्महत्या थांबवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी व बेरोजगारांना रोजगार देणे तसेच राज्यातील भीषण दुष्काळी स्थिती बाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. एकीकडे सार्वजनिक क्षेत्रात बोनसचा कायदा लागू झालेला असला तरी शेतकऱ्यांनी मात्र बोनस कधी पाहिलेलाच नाही. वर्षानुवर्षे जमिनीमध्ये गाळलेला घाम. केलेले श्रम व आठवलेले रक्त यांचे मूल्य शेतकऱ्या...
