Brahmakumari Shital Didi : शेती, शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर सेंद्रिय, शाश्वत यौगिक शेतीकडे वळणे गरजेचे – ब्रम्हकुमारी शितल दीदी -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| सद्यस्थितीला होत असलेल्या रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे व मानवी आरोग्याचे नुकसान होते आहे. शेती व शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर सेंद्रिय व शाश्वत यौगिक शेतीकडे वळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी शेतकरी बांधवांनी जागृत होऊन प्राकृतिक पद्धतीने शेती करावी. यासाठी यौगिक शेती करुन जीवन आनंदमय बनविण्याचा संकल्प सर्व शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन ब्रम्हकुमारी शितल दीदी यांनी केले.
त्या हिमायतनगर येथील ब्रम्हाकुमारीज सेवा केंद्रच्या वतीने आयोजित राष्ट्रीय किसान दिनानिमित्त शेतकरी बांधवांचा सन्मान व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या मंचावरून बोलत होत्या. राष्ट्रीय किसान दिन कार्यक्रमाची सुरुवात भुमातेचे पूजन करून झाली. यावेळी उपस्थित कार्यक्रमात शेतीच्या स्वदेशी पद्धती आणि कमी खर्चात प्रदूषणमुक्त, सकस उत्पादन आणि दर्जेदार अन्न देणार उत्पादन कसे मिळवता येईल आणि आपल्या मातृभूमीला...
