आसूड मोर्चाला यश…ई पीक पाहणी मध्ये नोंद नसलेला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार -NNL
नांदेड| राज्य सरकारने खरीप हंगाम २०२३ या काळातील सोयाबीन व कापूस उत्पादन शेतकऱ्यांना किमतीमध्ये घट झाल्यामुळे आर्थिक दिलासा देण्यासाठी हेक्टरी ५ हजार रुपयाची मदतीची घोषणा दि.२९ जुलै रोजी केली होती ही मदत देत असताना ई पीक पाहणी नोंद असेल त्याच शेतकऱ्याला मदत देण्यात येईल अशी जाचक अट घातली होती.
त्यामुळे राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहत होते. या विषयावर गावोगावी जनजागृती करत नायगाव तालुक्यातील भूमिपुत्रांनी नायगाव तहसील कार्यालयावर दि.२२ ऑगस्ट रोजी भव्य शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा काढला होता. या मोर्चाने बैलगाडीच तहसील कार्यालयाच्या गेटला बांधली होती. या मोर्चामध्ये प्रामुख्याने ई पीक पाहणीची अट रद्द करून सर्व शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्या...
