Are there any guardians for the farmers? : शेतकर्यांना कोणी वाली आहे का? -NNL
जगाचा पोशिंदा म्हणजे बळीराजा! एकेकाळी शेतकरी ‘राजा’ माणूस होता. शेतकर्यांच्या घरी रोजच दिवाळी अन् दसरा असायचा. शेतकर्यांच्या घरी खंडीभर ज्वारी ऐन पावसाळ्यात पडून राहायची. अडले- नडले शेतमजूर, कष्टकरी, रोजंदार लोक अडचणीच्या वेळी शेतकर्यांकडे हात पसरायचे, तेंव्हा शेतकरी उदार अंतःकरणाने पायली- दोन पायली (पाच किलो) ज्वारी सढळ हाताने वाटून टाकायचे, एवढे ऐश्वर्य शेतकर्याच्या घरी रहायचे. आज दिवस बदललेत, उलट परिस्थिती झाली आहे. आज शेतकर्यांनाच मुलभूत गरजांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते आहे. कारण पाऊसकाळ पूर्वीप्रमाणे राहिला नाही. पाणी पातळी खोल गेल्यामुळे सिंचनाखालील जमीन देखील कोरडी झाली आहे. कोरडवाहू आणि बागायतदार दोन्ही प्रकारचे शेतकरी आज चिंतातूर झाले आहेत.
कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे अनेक शेतकरी अठरा विश्व दारिद्य्राला कंटाळून, सततच्या नापिकीला कंटाळून ग...
