Kandhar Flood : कंधार तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी ; दोन तलाव फुटले : जगतुंग तलाव तुडुंब, ४४ जनावरे वाहून गेले
कंधार, सचिन मोरे| गेल्या ४८ तासापासून कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील चिखली,बोरीचा तलाव फुटला तर ४४ जनावरे वाहून गेले.दोन गावे पुराच्या पाण्याने वेढलेले आहेत.बाधित गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. तसेच तालुक्यातील अतिवृष्ठीमुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली त्यामुळे शेतकऱ्याचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
दि.७ आगस्ट च्या रात्रीपासून कंधार तालुक्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडवली आहे, जवळपास ३० ते ३५ गावात पूर परिस्थितीत निर्माण झाली आहे. तर तालुक्यातील चिखलीचा भवानी तलाव व बोरीचा तलाव फुटला असून नंदनवनच्या तलावास धोका निर्माण झाल्यामुळे सांडवा खोदण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.
तालुक्यातील २१ पूल पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावचा संपर्क तुटला. लिंबोटी धरणाचे १५ दरवाजे उघडल्यामुळे पुराचे पाणी मन्याडीत ...
