Devendra Fadnavis : हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL
मुंबई| सन २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. सन २०३० पर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जेचे उत्पादन करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्वाचे पाऊल टाकले असून ४७ हजार ५०० कोटींच्या सामंजस्य करारामुळे १८ हजार ८२८ रोजगार निर्मिती होणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत हरित ऊर्जा क्षेत्रातील एकूण चार कंपन्यांसमवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्याच्या ऊर्जा क्षेत्रासाठी वैशिष्ट्यपूर्ण असा हा कार्यक्रम आहे. हे प्रकल्प निर्धारित कालावधीत जलदगतीने मार्गी लावावेत, यासाठी शासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य कराराव...




