Homeकृषीsudden stoppage of fuel bore water : तोटंबा भागातील इंधन बोरचे पाणी...

sudden stoppage of fuel bore water : तोटंबा भागातील इंधन बोरचे पाणी अचानक अटल्याने शेकडो एकर वरील गहू मका ज्वारी नुकसानीत

किनवट, परमेश्वर पेशवे| बदलत्या हवामानानुसार कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण अशा या नैसर्गिक आपत्तीशी शेतकरी दोन हात करताना पहिलाच शेतकरी पहिलाच हतबल झाला असता पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्ती मध्ये सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र किनवट तालुक्यातील तोटंबा (sudden stoppage of fuel bore water) या भागात पहावयास मिळत आहे.

किनवट तालुक्याच्या मानसिंग नाईक तोटंबा परिसरात अचानक जमिनीतील पाण्याचे स्त्रोत कमी झाल्याने या गावातील बहुतांश इधन बोर कोरडे पडले आहेत त्यामुळे मका ज्वारी गहू ही नगदी पिके मोठ्या प्रमाणात वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावातील इंधन बोर नेहमीच मे महिन्यापर्यंत परिपूर्ण चालत होते आणि या इंधनबोरच्या माध्यमातूनच शेतकरी गहू मका ज्वारी ही नगदी पिके घेवून लाखो रुपयाचे उत्पन्न घेत होते.

मात्र फेब्रुवारी महिन्यातच येथील बहुतांश इंधन बोरचे पाणी अचानक गायब झाल्याने मका ज्वारी गहू ही उभे पिके जशास तशी वाळून गेली आहेत त्यामुळे हातात तोंडाला आलेली पिके वाळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी माहिती येथील सरपंच प्रतिनिधी डी के जाधव यांनी ही माहिती दिली.

या भागातील लक्ष्मण खिरू राठोड माजी सरपंच. प्रेमसिंग धूपसिंग राठोड, चंपत खिरु राठोड, रोहन देवराव जाधव, वसंत गणपत राठोड, साईनाथ सुंदर राठोड, धीरज प्रेमसिंग राठोड, संतोष नाजम चव्हाण, मोहन देवराव जाधव, अंकुश खातराव राठोड, जयवंत चोखला राठोड, रोहन देवराव जाधव, विकास सखाराम जाधव, यांच्या सह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील इंधनबोर अचानक कोरडे पडल्याने या शेतकऱ्यांच्या शेतातील शेकडो एकर वरील मका ज्वारी गहू ही नगदी पिके वाळून गेली आहेत.

त्यामुळे महसूल विभागाच्या व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी बांधावर येऊन वाळलेल्या पिकाचे पंचनामे करून रब्बी पीक विम्याच्या नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्यासाठी रब्बी पिक विमा उतरवलेल्या कंपनीला नुकसान भरपाई चा अहवाल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यातून होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments