Homeकृषीsprinklers : कडाक्याच्या थंडीतही रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांची झुंज; स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिकांचे...

sprinklers : कडाक्याच्या थंडीतही रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांची झुंज; स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिकांचे संरक्षण

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर सह नांदेड जिल्ह्यात हिवाळ्याची तीव्रता वाढल्याने परिसरात कडाक्याची थंडी जाणवत असली, तरी रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी शेतात अहोरात्र मेहनत घेत आहेत. तापमानात मोठी घट झाल्याने गहू, हरभरा, ज्वारीसह भाजीपाला पिकांवर थंडीचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

थंडीमुळे पिकांवर दव पडून वाढ खुंटू नये, तसेच ओलावा टिकून राहावा यासाठी अनेक शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले जात आहे.

कडाक्याच्या थंडीतही पहाटे व रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी दिवसा विजपुरवठा करावा अशी मागणी होते आहे.

महागाईच्या काळात खर्चात वाढ होत असतानाही पीक सुरक्षित राहावे, उत्पादनात घट येऊ नये यासाठी शेतकरी ही उपाययोजना करत आहेत. थंडीचे दिवस आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, शासनाकडून मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आला होता. आत्ता खरीपात झालेले नुकसान रब्बी पिकातून भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांची जमीन खारीपातील अति पावसामुळे रान तयार व्हायला उशीर झाल्याने आता कुठे गहू, हरभरा व इतर रब्बी पीक बहरू लागली असून, पिकांना वाचविण्यासाठी स्प्रिंकलर द्वारे पाणी देऊन उत्पादन घेण्यासाठी शेतकरी धडपडत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments