Thursday, June 25

Tag: even in the harsh winter; Protect crops

sprinklers : कडाक्याच्या थंडीतही रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांची झुंज; स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिकांचे संरक्षण

sprinklers : कडाक्याच्या थंडीतही रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांची झुंज; स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिकांचे संरक्षण

कृषी, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर सह नांदेड जिल्ह्यात हिवाळ्याची तीव्रता वाढल्याने परिसरात कडाक्याची थंडी जाणवत असली, तरी रब्बी हंगामातील पिके वाचविण्यासाठी शेतकरी शेतात अहोरात्र मेहनत घेत आहेत. तापमानात मोठी घट झाल्याने गहू, हरभरा, ज्वारीसह भाजीपाला पिकांवर थंडीचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. थंडीमुळे पिकांवर दव पडून वाढ खुंटू नये, तसेच ओलावा टिकून राहावा यासाठी अनेक शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले जात आहे. कडाक्याच्या थंडीतही पहाटे व रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी दिवसा विजपुरवठा करावा अशी मागणी होते आहे. महागाईच्या काळात खर्चात वाढ होत असतानाही पीक सुरक्षित राहावे, उत्पादनात घट येऊ नये यासाठी शेतकरी ही उपाययोजना करत आहेत. थंडीचे दिवस आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असल्याने शे...
error: Content is protected !!