लोहा। आपल्या जन्मभूमीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे कर्तृत्ववान भूमिपुत्रांना नेहमीच वाटते. प्रसिद्ध मेंदू विकार तज्ज्ञ डॉ प्रमोद वीरभद्र धोंडे व त्याचे सहकारी हे गेल्या नऊ वर्षा पासून नित्याने पावसाळ्याच्या आरंभी नांदेड शहराच्या लगत , पुर्णा,तालुका , लोहा -कंधार, बनवस या भागात वृक्ष लागवड व त्यास जाळ्या लावतात. त्याचे संगोपण व संवर्धन होते आहे की नाही याची चार -सहा महिन्याला माहिती घेतात. व्यस्थ कामातून वेळ काढत स्वतः तेथे जाऊन पाहणी करतात. असा हा उपक्रम त्यांनीं आपल्या जन्मभूमीत म्हणजे पेनूर येथेही राबविला, नारळाची व सावली देणारे वृक्ष लागवड आदर्श मातापिता वीरभद्र व अरुणाबाई धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

पेनूर या मूळ गावी यंदा भूमीपूत्र न्यूरोफिजिसीयन डॉ प्रमोद धोंडे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ अजित काबदे यांच्या उपस्थितीत पेनूर या गावात सय्यद बाबा दर्गा परिसर श्री व सौ. अरुणाबाई विरभद्र बोंडे व अतिशोष धोंडे यांच्या हस्ते नारळाची झाडे लावण्यात मालक गावातील लक्ष्मण ठोंबरे पप्पू गायकवाड, शंकर भागवत, कैलास धोंडे, उपस्थित होते त्यानंतर गावातील संभाजीनगर विठ्ठल रुकमाई मंदिर जवळ वड, पिंपळ, महागणी व अन्य सावली देणारे झाडे लावण्यात आलीं आहेत.

तसेच त्याला टीगार्ड लावले यावेळी भगवान लोखंडे आपाराव मुकदम, माधव गवते शिवाजी गवते विठोबा लोखंडे व इतर गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते. आपल्या कार्य बहुल्यातून वेळ काढत दरवर्षी वेगवेगळ्या भागात डॉ प्रमोद धोंडे व त्या टीम वृक्षारोपण करत असतात. यंदा त्यांनी आपल्या जन्मभूमीत नारळाची झाडे लावली व आपल्या गावाच्या सेवेचे दायित्व पार पाडले ग्रामस्थांनी वृक्षांचे संगोपन व संवर्धन केले पाहिजे असे डॉ प्रमोद धोंडे यांनी आवाहन केले आहे.



