नांदेड | नांदेड जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणाऱ्या व समाजात दहशत निर्माण करणाऱ्या तीन टोळ्यांमधील एकूण 13 सराईत गुन्हेगारांना नांदेड जिल्ह्याबाहेर सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले असून, ही कठोर कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश कुमार यांनी केली आहे.


ही कारवाई ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत करण्यात आली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांचा हा निर्णायक टप्पा मानला जात आहे. पोलीस ठाणे बिलोली, उमरी व मनाठा येथून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अंतर्गत तडीपारीचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यानुसार कायदेशीर चौकशी पूर्ण करून दिनांक 24/12/2025 रोजी अंतिम आदेश पारित करण्यात आले.

तडीपार करण्यात आलेल्या इसमांची नावे (एकूण – 13 इसम) असून, बिलोली, उमरी व हदगाव तालुक्यातील विविध गावांतील टोळीने गुन्हे करणारे हे इसम असून त्यांच्यावर मारहाण, दहशत, धमकी, बेकायदेशीर कृत्ये आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल होते. (नावे जशी दिली आहेत तसेच प्रसिद्ध करण्यात येऊ शकतात.)


वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही संबंधित गुन्हेगारांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांना समाजातून तात्पुरते दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी, कलम 55 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत या 13 इसमांना नांदेड जिल्ह्याच्या हद्दीबाहेर सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील एकूण कारवाई
सन 2024 व 2025 मध्ये कलम 55 अंतर्गत 94 प्रस्ताव प्राप्त, सन 2024–25 मध्ये 55 टोळ्यांमधील 172 इसम तडीपार 35 सराईत गुन्हेगार MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून, नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीला कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या व टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे.

