उस्माननगर, माणिक भिसे| समाजक्रांतीचे अग्रदूत असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व समाजकार्याच्या माध्यमातून शोषित, वंचित, श्रमिक वर्गासाठी आवाज उठवला. त्यांचे विचार आजही मोलाचे असून साहित्याच्या माध्यमातून क्रांती घडवणारे अण्णाभाऊ साठे समाजाचे प्रेरणास्त्रोत असल्याची भावणा मुख्याध्यापक तथा माजी उपसरपंच राहुल सोनसळे यांनी व्यक्त केली.

सिध्दार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित सम्राट अशोक प्राथमिक शाळेत साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्य जयंती निमित्त व थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी उपसरपंच तथा शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांनी अण्णाभाऊ – साठे व थोर समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शाळेतील स्वयपाकिन कर्मचाऱी यांची मुलगी शबुरी रावसाहेब भिसे हिने ऑल इंडिया सैनिकी स्कुल परिक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे, सौ. प्रियदर्शिनी किशनराव चैनपुरकर , मन्मथ केसे , भगवान राक्षसमारे , देविदास डांगे , सिध्दोधन लाटकर , एस.एस.भालेराव , आर एस.सोनकांबळे , शखिल शेख , यांच्या सह विद्यार्थी,पालक आदिंची उपस्थिती होती.


अग्रदूत असलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य व समाजकार्याच्या माध्यमातून यावेळी सोनसळे म्हणाले कि, समाजक्रांतीचे शोषित, वंचित, श्रमिक वर्गासाठी एक युगपुरुष होते. त्यांनी आपल्या शब्दांतून शोषित, वंचित, आवाज उठवला. अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हते, ते अण्णा भाऊ साठे मेहनतकर्यांचे दुःख जगासमोर मांडले. त्यांच्या प्रत्येक कथेमध्ये, काव्यात आणि गाण्यात माणसाचे दुःख, दिसून येते. अण्णाभाऊंनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाज परिवर्तनासाठी लेखणीला शस्त्र बनवले. आजच्या काळातही अण्णाभाऊंच्या विचारांची नितांत गरज आहे. जातीभेद, विषमता, अन्याय आणि अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांची शिकवण आपल्याला मार्गदर्शन करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.


