अमृतसर दर्शन, उकाडा विरुद्ध उत्साह
सकाळी निवांत ८ वाजता उठलो. विजया दत्ता खानसोळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना आग्रहाने नाश्ता दिला.काश्मीर मधील अंगाला झोंबणारी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर अमृतसरची गर्मी असह्य झाली होती. तरी देखील उकाडा बाजूला टाकत सर्वांनी प्रखर श्रद्धेने “जलियानवाला बाग” पाहिलं., “अहिंसेचा मंत्र जपला… पण इथली हिंस्र सत्यकथा डोळ्यात पाणी आणणारी.”

स्वर्ण मंदिर: आदराचे दर्शन
प्रत्येक वर्षीप्रमाणे पगडी बांधायची परंपरा सुभाष देवकत्ते यांनी जपली.स्वर्ण मंदिर चे इन्फॉर्मेशन ऑफिस गाठलं. तिथे माझे स्नेही, ज्येष्ठ पत्रकार सरदार चरणजीतसिंघ अरोरा तसेच पीआरओ सरदार रणभिरसिंघ यांची भेट झाली. विशेष दर्शनाची सोय झाली. धार्मिक पुस्तकेही सर्वांना भेट म्हणून दिली गेली. स्वर्ण मंदिरात मस्तक टेकवून मन तृप्त आणि मनगट सजग! बहुतेक गोल्डन टेम्पल चे लंगर जगातले सर्वात मोठे लंगर असावे. या ठिकाणी दररोज एक लाखापेक्षा जास्त लोकांना गरमागरम जेवण वाटले जाते. जेवणाऱ्यांची संख्या पाहता, किती कच्चा माल लागेल याची कल्पना करा ! लंगरच्या स्वयंपाकघरात दररोज सुमारे ५० क्विंटल गहू, १८ क्विंटल डाळ, १४ क्विंटल तांदूळ आणि ७ क्विंटल दूध वापरले जाते. जेवण शिजवण्यासाठी शंभर गॅस सिलिंडरची आवश्यकता असते. लेबनॉनमधील एका भक्ताने दान केलेले रोटी बनवण्याचे यंत्र दिलेले आहे. जे फक्त १ तासात २५,००० रोट्या बनवू शकते! स्वयंपाकघरात दोन जेवणाचे हॉल आहेत, ज्यांची एकत्रित क्षमता ५००० लोकांची आहे. लोक जमिनीवरच्या चटईवर जेवायला येतात आणि बसतात, स्वयंसेवक त्यांना जेवण देतात.

देशभक्तीचा ज्वालामुखी:अटारी बॉर्डर
दरवर्षी VIP पास ची मारामार असायची. काहींना मिळायचे तर काहींना नाही. यंदा गोल्डन टेम्पल कडून आलेल्या शिफारशीमुळे ९० VIP पास मिळाले.तसेच संजय कळकोटे यांच्या मुलाचा मित्राचा भाऊ bsf मध्ये असल्यामुळे त्याने सुद्धा 90 जणांचे पासेस काढून दिले.गेल्या वर्षी अमरनाथ ला आलेल्या रेखा भताने व सारिका केंद्रे यांचे भाऊजी, बीएसएफचे रामदास जायभाये प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यामुळे म्युझियम, बॉर्डरपर्यंत सर्वाना प्रवेश मिळाला.


स्टेडियममध्ये “भारत माता की जय!” चे गगनभेदी नारे!
जणू काही ४६ डिग्री चं तापमानही मागे पडलं होतं! वसुबेन पटेल, वंदना सुर्यवंशी, मिनाक्षी हिंगोले, चित्ररेखा पांडे , अनिता ढाकणे,छाया केंद्रे, गिता पावडे, राधा घुगे ,सुरेखा मुंढे, माधवी जोशी ,रूपाली वडजकर यांनी तिरंगे झेंडे घेत पाकिस्तानच्या बार्डर पर्यंत धाव घेतली. देशभक्तीपर गाण्यांवर ज्योती वाघमारे,सुनीता कलकोटे, कांचन जोशी, सुप्रिया कुलकर्णी, प्रतीक्षा केंद्रे यांनी भांगडा केला.

गरबा करताना कल्पना संगेवार ,आशा पल्लेवार, निर्मला केंद्रे विमल व गोदावरी चव्हाण ,सुनीता व्यवहारे, अरुणा गिरी ,ज्योती शिवणीकर,वंदना सद्दीवाल ,सुनीता केंद्रे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शर्वरी वडजकर, रेणुका जोशी,सपना सतलावार,शिल्पा मोरलवार,रेश्मा पवार ,माधुरी सराफ, अनुराधा जोशी, प्रेमला नागरगोजे यांनी फुगड्या खेळल्या. जयमाला लटपटे, सुवर्णा केंद्रे,प्रणिता कुलकर्णी, सुनिता जैन, विजया खानझोडे, मीरा वानोळे , कमलबाई जाधव यांनी दिलेल्या घोषणानी संपूर्ण स्टेडियमचे लक्ष वेधून घेतलं.वसुबेन, सारिका यांनी विदेशी महिलांना सोबत घेऊन देशभक्ती गीतांवर ठेका धरला. आमचा नव्वद जणांचा संपूर्ण संघ ‘अमरनाथ यात्री संघ’ टी-शर्टमध्ये चमकत होता.
रिसेप्शनसारखे भोजन,सेवा, सन्मान
अटारीवरून परतल्यानंतर अरोरा मंगल कार्यालयात दरवर्षी प्रमाणे सरदार जागीरसिंघ यांच्यातर्फे सर्व आज रात्रीचे भोजन असते. पण ते अमेरिकेत असल्यामुळे यावर्षी भोजनाची व्यवस्था होईल की नाही ही शंका मनाला सतावत होती. पण त्यांचे चिरंजीव सरदार जसबीरसिंघ यांनी पित्याची परंपरा अतिशय उत्कृष्ट तेने निभावली.त्यांनी यात्रेकरूंना सत्काराने भरून टाकलं. खऱ्या अर्थाने आदरतीर्थ्य आणि निस्वार्थ सेवाभाव! ’एखाद्या वऱ्हाडला जेवण देतांना ज्या प्रमाणे सरबरस करतात तशी उत्तम व रुचकर जेवणाची व्यवस्था जसबीरसिंघ जागीरसिंघ यांनी केलेली होती. दिवस भर अतिशय धावपळीचा व उकड्यात गेल्यामुळे हॉटेल नय्यर च्या वाताणूकलीत प्रशस्त बेड वर निद्रादेवीने कधी ताबा घेतला हे कळाले देखील नाही. (क्रमश:)

