श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर शहरात भाविक महिला कडून वटसावित्री पौर्णिमा निमित्त वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून वटसावित्री पौर्णिमा साजरी करत असताना वटवृक्षावरील मऊळ (मधमाशा) उठल्याने अचानकपणे महिला व रस्त्यावरून जाणाऱ्या पुरुषावर हल्ला केल्याने काही महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि १० जून रोजी दुपारी ३ वाजता वार्ड क्रमांक ५ मधील हनुमान मंदिराजवळील वटवृक्षाच्या पायथ्याशी असलेल्या वट्यावर घडली आहे.

शहरातील प्राचीन व अनेक वर्ष जूना असलेल्या वटवृक्षाला दोरा गुडाळून महिला दरवर्षी वटसावित्री पौर्णिमा साजरी करीत असतात. सकाळ पासून महिलांनी पूजा, दर्शन,व दोरा बाधण्याकरीता गर्दी केली होती तसेच येणाऱ्या प्रत्येक भाविक महिलांनी अगरबत्ती, धुप लावून नारळ अर्पण करत वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून मनोभावे पूजा करत होते.

दुपारी तीन वाजता अगरबत्ती धूप चा धूप्पट (धुवा) जास्त झाल्याने झाडावर असलेल्या माऊळातील मधमाशांनी अचानकपणे येथे दर्शना करीता आलेल्या महिलावर हल्ला चढवला यामध्ये सौ. चंदा दिलीप पांडे वय ६५ राहणार ब्राह्मण गल्ली माहूर आणि रस्त्यावरून चाललेले विलास मोतीराम पवार ४५ वर्षे राहणार बंजारा तांडा माहूर यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला त्यामुळे दोघेही अंती गंभीर झाले, तर अनेक महिलांना मधमाशांनी चावा घेतल्याने महिलांनी तेथून पळ काढला मात्र दोघेच गंभीर झाल्याने दोघांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ, किरण कूमार वाघमारे यांनी जखमीवर उपचार केले,व प्रकुती धोक्या बाहेर असल्याचे सागितले.


या दिवशी लक्ष्मी नारायणच्या पूजेसह विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाला दोरा गुडाळून प्रदक्षिणा घालून पूजा करतात. वटपौर्णिमेचे व्रत सौभाग्य, सुख, संपत्ती आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जातात.वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटवृक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास्तव्य करतात असे मानले जाते. त्यामुळे वट सावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने या तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो.


