कृषीनांदेड

E-KYC : बँकेमधील ई – केवायसी मध्ये सुसूत्रता आणावी

नांदेड/नायगाव| ई -केवायसी (E-KYC) साठी नायगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये तालुक्यातील अनेक शेतकरी, महिला कडाक्याच्या थंडीमध्ये रांगा लावून बसत आहेत. अनेक नागरिकांच्या आठ ते दहा दिवस बँकेच्या चकरा मारून सुद्धा केवायसी होत नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. बँकेतील ई- केवायसी सुसूत्रता आणावी व नागरिकाची गैरसोय टाळावी अशी आवाहन शेतकरी पुत्रांनी दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर (Pandurang Shinde Manjaramkar) यांनी म्हटले आहे.

या निवेदनामध्ये खातेदाराचे होल्ड उठवण्यात यावे, शेतकऱ्यांना शाखेमध्येच पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, सुशिक्षित बेरोजगार युवकांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे , विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून द्यावे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी हिंदू युवा परिषदचे रणजित देशमुख, छावा संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, साहेबराव चट्टे, बालाजी पाटील धनजकर, गजानन कदम इत्यादी उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button