Himayatnagar : हिमायतनगरला फसवणाऱ्यांना जनता विचारणार हिशेब ; वर्षानुवर्षांचा ठेपलेला विकास आता गतीमान होणार?
हिमायतनगर, अनिल मादसवार| वर्षानुवर्षे तुटक पाणीपुरवठा, खड्डेमय रस्ते, कचऱ्याचे साम्राज्य, तुंबलेल्या नाल्या आणि रखडलेल्या मूलभूत सुविधा… अशा परिस्थितीत जगण्याची सवय झालेल्या हिमायतनगरच्या नागरिकांनी या वेळी बदलाची हाक दिली आहे. सामान्य नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष, निधीचा अपुरा वापर आणि विकासाच्या नावाखालीली स्थिरावलेली प्रगती… या सर्व पार्श्वभूमीवर शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.
याच बदलाच्या अपेक्षेने, “ट्रिपल इंजिन सरकार” या संकल्पनेवर आधारित प्रचाराला मोठी गती मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री, राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेंद्र वानखेडे यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
उच्चशिक्षित, प्रामाणिक प्रतिमा असलेले आणि गेली तीन दशके वैद्यकीय सेवे...
