…therefore, opposition to Shaktipeeth Highway …म्हणून शक्तीपीठ महामार्गाला विरोध
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व बीड या सहा जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग बनविण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठी महाराष्ट्रातील 28 हजार एकर जमीन या महामार्गासाठी बाधीत होणार आहे. हा महामार्ग बेकायदेशीर पद्धतीने केला जात असल्याचे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित महामार्ग पवनार ते पत्रादेवी (नागपुर-गोवा) असल्याचे घोषित केले आहे. सदर महामार्गाची प्रस्तावना पाहिली असता माहूर, कोल्हापूर व पवनार येथील असलेल्या तिन्ही देवींच्या मंदीरांना तसेच इतर धार्मिकस्थळांना जोडणारा रस्ता असे सांगण्यात आले आहे. तीन शक्तीपीठे प्रस्तावित महामार्गाने जोडत असल्यामुळे त्यास शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु भूसंपादन, वाजवी नुकसानभरपाई हक्क व पारदर्शकता, पुनर्वसन आणि पूर्नस्थापना (महाराष्ट्र सुधारणा) कायदा 2018 कलम 2(1) मधील ...
