Assistant Inspector of Police : नागरिकांनी आपला परिसर प्लास्टिक मुक्त करावे – स.पो.नि.पवार
उस्माननगर, माणिक भिसे| माणसाच्या जीवनामध्ये स्वच्छ हवा शुद्ध पाणी सकल व भेसळयुक्त अन्न यातील बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक जण आपले घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण सार्वजनिक ठिकाणच्या बाबतीमध्ये इतकी उदासीनता का आहे ? अलीकडच्या काळामध्ये ग्रामीण असो वा शहरी भाग घनकचऱ्यांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. यामध्ये मुख्यत्वे प्लास्टिकच्या वस्तू व पॉलिथिन बॅग कचऱ्याचा समावेश आहे दैनंदिन जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील या वस्तूचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने जागोजागी प्लास्टिकचा कचरा आपल्याला दिसून येतो त्यामुळे मानवी जीवनासह त्या त्या परिसरातील पशुपक्षी यांचेही जीवन धोक्यात येत आहे.
दैनंदिन व्यवहारात वापरले जाणारे प्लास्टिक रस्त्यावर व इतरत्र फेकली जातात. प्लास्टिक हे नष्ट होत नाही त्याचा पर्यावरणावर मोठा परीणाम होतो .त्यामुळे आरोग्याला धोका होत आहे . त्यामुळे...
