वरिष्ठानी लक्ष देण्याची गरज…. महावितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे तारांची चोरी -NNL
उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालुक्यातील शिराढोण येथे दि.28जुलै रोजी रात्रीच्या सुमारास जवळपास सव्वालाख रुपये किमतीच्या तारांची चोरी झाल्याचे समजते पण तार चोरट्यानी नेला कि महावितरनाणे नेला? अशी चर्चा परिसरातील शेतकऱ्यातून ऐकवायास मिळत आहे.
या कॉपर तार चोरीमुळे शिराढोण -गोळेगाव गावांतील शेतकऱ्यांचा शेतीतील विद्युत पुरवठा बंद झाला आहे परिसरातील काही जमिनी सुपीक असल्यामुळे शेतातील स्प्रिंकलर लावून चालवलेला प्रयत्नही यामुळे बंद पडला आहे. त्यामुळे शेतातील लाखमोलाचे पीक करपू लागले आहे. चोरीच्या या प्रकारामुळे या भागातील जनावरांचा पिण्याच्या पाण्याचीही मोठी गैरसोय होत आहे. चोरीला गेलेल्या या तारांमुळे खंडित झालेला वीजपुरवठा नियमित करण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आद्यप तरी कुठले प्रयत्न करीत नसल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील शिराढोण -गोळेगाव परिसरातील शेतकरी अनेक दिवसापासून ट्रीप होणाऱ्या...
