Har Ghar Tricolor Rally : उस्माननगर येथील चार शाळेच्या वतीने हर घर तिरंगा रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्माननगर, माणिक भिसे| स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात, उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर मागील तीन वर्षांपासून राज्यात घरोघरी तिरंगा हे अभियान राबविण्यात येत असून सदरील अभियान यावर्षी सुध्दा राबविण्यात येत असल्याने दि १२ ऑगस्ट मंगळवारी सकाळी उस्माननगर येथील चारही शाळेतील विद्यार्थी, सहशिक्षक व काकांडी येथील युवा ॲकडमी यांनी तिरंगा रॅलीत सहभागी व्होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दरम्यान उशिरा आलेल्यांनी रॅलीत उभे राहून फोटो काढण्यासाठी लगबग दिसून आली.
महाराष्ट्र शासनाच्या निदर्शना नुसार हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या आभियाना अंतर्गत उस्माननगर येथील चार शाळा व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने दि.१२ ऑगस्ट रोजी सकाळी दत्त मंदिर, समता विद्यालय , झेंडा चौक ते गावातील प्रमुख मार्गाने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्य...
