Heavy rain disrupts : दमदार पावसाने सोयाबीन काढणीत व्यत्यय, कापूस, सोयाबीन खराब होण्याचा धोका – NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| तालुक्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाला सुरुवात होवून दि.८ आॅक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान केले आहे.अशातच काल दुपारी १ वाजताच्या व दुपारी ३ च्या दरम्यान पून्हा जोरदार अर्धा तास पाऊस झाला. दरम्यान, काढणी सुरू असलेले सोयाबीन जाग्यावरच भिजल्याने अनेक शेतकर्याचे नूकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.
मंगळवारी व गुरुवारी पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यात कापूस आणि सोयाबीन असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांची लागवड केली जाते. यावर्षी चांगला भाव मिळणार, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. परंतु या दोन्हीही पिकांचे पावसाने आता मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती अ...
