Soybeans did not germinate : सोयाबीनची उगवणच झाली नाही ; कंपनीसह दुकानदावर गुन्हा दाखल करा
नांदेड, अनिल मादसवार| सोयाबीनची उगवणच झाली नसल्याने फसवणूक (Soybeans did not germinate) झालेल्या शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार पाठवून या प्रकरणात लक्ष घालून 'इनोवेज १०८' या सोयाबीन कंपनीवर आणि बालाजी कृषी सेवा केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करून टाळे ठोकण्यात यावे आणि झालेल्या नुकसानीची भरपाई करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकरी बालाजी बाबुराव हेंद्रे रा. देळूब यांनी केली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येतील शेजारी बालाजी बाबुराव हेंद्रे रा. देळूब, ता अर्धापूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, नांदेडच्या नवा मोंढा भागातील बालाजी कृषी सेवा केंद्रातून ३ जून २०२५ रोजी इनोवेज १०८ व उन...
