बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती वाढते, नैराश्य व चिंता यांचा धोका कमी होतो यामुळे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने हा खेळ खेळावा -अनिल महामुने – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| बुद्धिबळ खेळणं हे मनाला तीक्ष्ण करते, यामुळे आय क्यू ( IQ ) पातळी सुधारते. याशिवाय या खेळातून शिकण्याची क्षमताही झपाट्याने विकसित होते. बुद्धिबळ हा मेंदूच्या व्यायामासाठी एक उत्तम खेळ आहे. बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती वाढते. यामुळे नैराश्य आणि चिंता यांचा धोका कमी होतो. यामुळे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने हा खेळ खेळावाच तसेच आपल्या आवडीच्या खेळात प्राविण्य मिळवावे. सध्या सुरू असलेल्या जागतिक ऑलिम्पिकचे सामने सुद्धा पाहून आपली खेळ भावना जागृत करावी , असेअसे प्रतिपादन पीएम पोषण शक्ती निर्माण योजना किनवटचे अधीक्षक अनिल महामुने यांनी केले.
येथून जवळच असलेल्या कोठारी (चि) येथील मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमु...
