Lendi flood area ; लेंडी बुडीत क्षेत्रातील दुर्घटनेवर शिवसेनेचा संताप – तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याकडे आर्थिक मदतीची मागणी
मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील दुर्घटनेत गावकऱ्यांचे मोठे हाल झाले असताना शासन प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे १२ जणांचा बळी गेला. शेकडो जनावरे दगावली, शेतपिके व घरे वाहून गेली, शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तरीसुद्धा महाराष्ट्र शासन व स्थानिक आमदार गप्प बसले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याकडे धाव घेत तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
हैदराबाद येथे नांदेडचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शिवसेनेचे पाटील यांनी सांगितले की, लेंडी प्रकल्पातील ६० टक्के पाणी तेलंगणाचा वाटा असल्याने या आपत्तीत बाधित कुटुंबांना, शेतकऱ्यांना, मजुरांना व गोरगरीबांना तेलंगणा सरकारकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर व्हावी.
प्रशासनाने ...
