Dr. Hansraj Vaidyav; ” लक्षवेधी महा पदयात्रा व आमरण अन्न पाणी त्याग”करण्या शिवाय ज्येष्ठ नागरिकांना आता कसलाच पर्याय उरला नाही ! – डाॅ.हंसराज वैद्य
नांदेड l पंचविस फेब्रुवारीला उ.म.प्रा.विगाग फेस्काॅम नांदेडच्या वतिने महाराष्ट्र शासनास अर्थात मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, मा.ना.उपमुख्यमंत्री द्वयांना, मा. ना.संजयजी शिर्साट साहेब मंत्री सामाजिक न्याय यांना,मा.प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग यांना सविस्तर निवेदन मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत पाठऊन विंनंती केलेली होती की सरसकट नको, पण खरे गरिब, गरजवंत,दुर्लक्षित,उपेक्षित,वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार,विधवा माता, निराधार, दिव्यांग अदि ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या बाकी चालू असलेल्या कुठल्याही योजनांचा कसलाच फायदा मिळत नाही.
म्हणून त्या बंद करून,त्यांना एकमात्र "मुख्यमंत्री लाडके ज्येष्ठ मायबाप योजना" व "सन्मान धन" तथा "मानधन" चालू करा व इतर प्रलंबित मागण्या विषयी माहिती दिलेली होती.पुन्हाही पाठपुरावा केलेला होता.नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊही आमदारांना हे निवेदन दिले...
