Nanded News : मनपाच्या दुर्लक्षितपणामुळे नागरिकांना प्यावे लागते दूषित पाणी; साथीचे आजाराची लागण होण्याची भीती
Citizens have to drink contaminated water due to the negligence of the Municipal Corporation; Fear of contracting epidemic diseases नांदेड| शहरातील भोई गल्ली व सिद्धनाथपुरी येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती भर पावसाळ्यात भटकंती होत असून, महानगरपालिकेचे आयुक्त टंचाईग्रस्त भागाकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना नळाद्वारे कधीतरी पाणी पुरवठा केला जात आहे. केला तरी ते पाणी सुद्धा दूषित, दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांना साथीचा आजाराचा सामान करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पावसाळा आला तरी नांदेड वाघाळा महानगर पालिका हद्दीतील भोई गल्ली व सिद्धनाथपुरी येथील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे. महानगरपालिकेचे आयुक्त हे उंटार बसून शेळ्या हाकत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. नळाद्वारे येणार पाणीपुरवठा तो हि दोन दिवसा आड येत अस...

