Raised the weapon : मानवी छळ प्रवृत्तींच्या विरोधात कवितेचे शस्त्र उगारले
नांदेड| मानवी छळ प्रवृत्ती म्हणजे शारीरिक, मानसिक, लैंगिक किंवा आर्थिक स्वरूपाचा अत्याचार करण्याची प्रवृत्ती होय. जात, लिंग, धर्म किंवा वयाच्या आधारावर भेदभाव केला जातो. मानवी छळ हा विविध स्वरूपात होतो आणि त्याला कायद्याने व समाजाने विरोध करणे आवश्यक आहे, जेणेकरून पीडितांना न्याय मिळेल आणि भविष्यात असा छळ थांबेल.
छळाला विरोध करण्यासाठी अनेक कायदेशीर आणि सामाजिक उपाय आहेत. परंतु जनजागृती करण्यासाठी शहर व परिसरातील कवी कवयित्रींनी मानवी छळ प्रवृत्तींच्या विरोधात कवितेचे शस्त्र उगारले. यासाठी घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री ज्योती करवंदे परांजपे यांची तर अतिथी कवी म्हणून सदानंद सपकाळे, देविदास वाघमारे, सुनंदा भगत, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, नागोराव डोंगरे, काव्य पौर्णिमचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, रणजित गोणारकर, साईनाथ रहाटक...
