महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महा ग्रामीण नवचेतना संवाद यात्रा भव्य समारोप सोहळा संपन्न -NNL
नांदेड। महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांचे हित जपत शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कर्ज दिले, देऊन शेतकऱ्यांकडून पीक कर्ज मुद्दतीच्या आत भरून घेऊन बिनव्याजी कर्जाचा फायदा करून दिला आहे त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून फायदा मिळवून दिला आहे त्यामुळे महाराष्ट्र ग्रामीण बँक ही काही ठीकाणी नंबर वन तर काही ठिकाणी दोन वर आहे अशीच वाटचाल हो त्यामुळे शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जात आहे असे प्रतिपादन शनिवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नवचेतना संवाद यात्रा भव्य समारोप व्यासपीठावरून बोलत होते.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचा भव्य समारंभ सोहळा नक्षत्र हाॅल नांदेड येथे मुख्य अतिथी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड यांच्या प्रमुख उपस्...
