Mahur ; माहूर तालुक्यात जलजीवन मिशनची कामे अद्याप अपूर्णच योजनेचा एकाही गावाला लाभ नाही
श्रीक्षेत्र माहूर l प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध जल पुरविण्यासाठी भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने सन 2019 मध्ये जलजिवन मिशन या नावे पाणी पुरवठा योजना लागू केली. त्याचा गवगवा करण्यासाठी जाहिरातीवर करोडो रुपयाचा खर्च केला. या योजनेअंतर्गत माहूर तालुक्यातील 51 गावात कामे मंजूर करण्यात आली,त्यासाठी 53 कोटी एवढा अंदाजित निधी मंजूर करण्यात आला, परंतु आजमितीस एकाही गावातील काम पूर्ण झाले नसल्याने शासनाने केलेला गाजावाजा आजतरी फोल ठरल्याची प्रचिती येत असून उन्हाळा लागण्यापूर्वी या योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे
माहूर तालुक्यातील 51 गावात जलजीवन मिशन अंतर्गतच्या अधिकांश कामांना सन 2022 व 2023 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला,काम पूर्ण करण्यासाठी कालावधी सुद्धा निर्धारित करण्यात आला, परंतु आजमितीस वसराम नाईक तांडा, सेलू, गोंडखेडी, मच्छिंद्र पार्डी/दासू नाईक तांडा,दिगडी...
