Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पहेलगाम हल्ल्याचा बदल भारताने घेतला
भारतीय हवाई दलाने मंगळवारी रात्री १:०५ मिनिटांनी पाकिस्तान आणि पीओकेमध्ये म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये ९ ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून भारतीय जवानांचे कौतुक होत असून, ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पहेलगाम हल्ल्याचा बदल भारताने घेतला असून, पाकिस्तानला आणखी धडा शिकविण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
एकूणच हवाई दलाने ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे. यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. भारताची ही प्रत्युत्तरात्मक कारवाई पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर करण्यात आली आहे आणि त्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव त्या महिलांना समर्पित आहे ज्यांचे पती २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरसाठी तिन्ही सैन्यां...
