An important moment for the livelihood of tribals | आदिवासी बांधवांना मधल्याकाळी उदरनिर्वाहसाठी महत्वाचा क्षण – NNL
हिमायतनगर| तालुक्यातील दुधड /वाळकेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी वर्षानुवर्षे वसलेल्या काही वाडया त्यामध्ये...वडाचीवाडी, धनेवाडी, बुरकुलवाडी, रामनगर या गावातील आदिवासी बांधवाना रानभाजी कर्टुले वरदान ठरू लागले आहेत.
नांदेड जिल्यात सर्वात मोठी कर्टूल्याची बाजार पेठ म्हणून वाळकेवाडी ओळखली जाते. येथील माल हे थेट भारतात सर्वात मोठी कर्टूल्याची बाजारापेठ असलेले ठिकाण हेंद्राबाद या ठिकाणी दर शुक्रवारी निर्यात केला जातो.जंगलामधील रान भाज्या तसेच रानफळे विकून उदरनिर्वाह करणारे या भागातील आदिवासी बांधवांना आर्थिक श्रोत निर्माण झाला आहे. रानातील चांगल्या प्रतीच्या आयुर्वेदिक शरीराला उत्तम स्वास्थ्य देणाऱ्या भाज्या व फळे नागरिकांना खायला मिळतात.
या रान भाज्यांमध्ये करटुले नामक एक भाजी असून, ती भाजी शरीरासाठी अत्यंत चांगली आहे. या भाजीला कुठलीही रासायनिक फवारणी या खत व...
