श्रामणेर दीक्षाभूमीचे संकल्पक – भदंत पंयाबोधी थेरो -NNL
आंबेडकरी चळवळ मूळातच विश्वव्यापी विचारांची चळवळ आहे. कारण आंबेडकरी विचारच वैश्विक विचार आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीतच आंबेडकरी चळवळीचे संविधान लिहिले. ते आजही सर्वांनाच लाभदायक, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरते. आंबेडकरी विचार हा विश्वकल्याणाचा विचार आहे. मानवासह जीव जंतू आणिक विश्वकल्याणाचा विचार आहे. १९५६ नंतर ही चळवळ धम्मचळवळ म्हणून प्रवाहीत होते. ही चळवळ बुद्ध विचारांचे सौंदर्य लपेटून घेऊन पुढे जाते. कुण्या एखाद्या कार्यकर्त्याच्या किंवा संघटनेच्या कार्यावर अथवा विचारधारेवर धम्म चळवळीची महत्तम दिशा ठरत नाही. इतर बौद्ध राष्ट्रांप्रमाणे भारतातही धम्मचळवळ व्यापक स्वरूपाची आहे.
मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिका यांच्यात बौद्ध तत्त्वज्ञानाची पेरणी करावी लागणे आजची गरज म्हणून निर्माण होत असेल तर अगदी मुळापासून या कार्याची सुरुवात करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बाब...
