Ceo minal karanwal ; ग्रामविकासासाठी समन्वयाची गरज – सीईओ मीनल करनवाल -NNL
नांदेड। विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गावकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, उद्भवणाऱ्या समस्या व असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय ठेवल्यास कामे जलद गतीने होतील, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मुखेड तालुक्यातील खरब खडगाव, चांडोळा तांडा व बिल्लाळी गावांना भेट देत जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी गावांतील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना, घरकुल तसेच ग्रामविकासाशी संबंधित अन्य कामे पाहून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला तसेच त्यांची मते व अडचणी समजून घेतल्या.
बिल्लारी येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम प्रलंबित होते. या संदर्भात मीनल करनवाल यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. या कामांना सुरुवात ...
