Indigent beneficiaries : चार महिन्यांपासून निराधारांचे थकलेले अनुदान द्या
नांदेड। संजय गांधी निराधार (Indigent beneficiaries) योजनेचा मुख्य उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे असा आहे. अशा घटकांनी समाजातील इतर घटकांवर अवलंबून न राहता स्वतःला आत्मविश्वासाने जगता यावे म्हणून ही योजना महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सुरू केलेली आहे.
या योजनेअंतर्गत, निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य म्हणून सध्या दरमहा पंधराशे रुपये मानधन दिले जाते परंतु सप्टेंबर - आक्टोंबर २०२४ पासून ते आतापर्यंत नांदेड शहर व जिल्ह्यातील काही तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना अद्याप मानधन मिळाले नसल्यामुळे अंध-दिव्यांग, अनाथ मुले, मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, वयोवृद्ध, विधवा, घटस्फोटीत महिला, परित्यक्ता महिला, अत्याचारी महिला या सर्व लाभार्थ्यांवर सध्या वाढत्या महागाईमुळे उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे.
शासन स्तरा...
