crop harvesting : पिक कापणी प्रयोगात पिक कोरडेपणाचे वजन ग्राह्य धरा- अविनाश टनमने यांचेसह शेतकऱ्यांची मागणी
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यात पीक कापणी प्रयोग करत असताना सध्या जास्त ओलावा असल्यामुळे वजन जास्त येत आहे त्यामुळे कापणी प्रयोग केल्यानंतरचे वजन आणि सात ते दहा दिवसानंतर सुकवल्यानंतर चे वजन दोन्ही नोंदवण्याचे पिक कापणी प्रयोगात पिक कोरडेपणाचे वजन ग्राह्य धरा असे आदेश कृषी आयुक्तालयाने दिलेले आहेत. या संदर्भात प्रत्येक गावच्या सरपंच आणि शेतकरी बांधवांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्यात येऊन यावर्षीचा खरीप हंगाम 2025-26 येणारा पीकविमा हा पीक कापणी प्रयोगावर आधारित असल्यामुळे तहसीलदार अभिजित जगताप व तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड यांच्याकडे निवेदन मार्फत अविनाश पुंडलिक टनमने किसान ब्रिगेड जिल्हा संघटक नांदेड यांचे सह शेतकऱ्यांनी याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली आहे.
तालुक्यात एकूण १०८ ठिकाणी पिक कापणी प्रयोग यामध्ये सोयाबीन २४ गावात ४८ ठिकाणी तर कापूस २४ गावात ४८ ...
