देगलूर तालुक्यातील शहापूर परिसरातील शेतकर्यांचे आधारकार्ड नसल्याने अनूदान थांबले -NNL
देगलूर, गंगाधर मठवाले। तालुक्यातील मौजे शहापूर शहापूर येथील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी कृषी कार्यालयात कागदपत्र देऊनही अनुदान मिळत नसल्याने शासनाचे आश्वासन हवेत विरले की काय..? असा प्रश्न आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गातुन व्यक्त केला जात आहे. तर कृषी विभागाने ज्या शेतकऱ्यांनी आधार कानेकट केलं नाही त्यानी बैंक खाते आधार शी जोडुन घ्यावं तरच अनुदान मिळेल असं सांगितले आहे.
शासनाने गेल्या वर्षी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपय देण्याचे आश्वासन दिले अन् दहा सप्टेंबर नंतर शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले, त्यामुळे शासनाचे अनुदान कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत. चार दिवस उलटून देखील रक्कम जमा न झाल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता दोन हजार शेतकऱ्यांपैकी चारशे...
