Continuous rain : हिमायतनगरात संततधार पाऊस सुरूच; सोयाबीन–कापूस धोक्यात, शेतकरी हतबल
हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाची संततधार सुरू असून, शेतकऱ्यांच्या शेतातील पिके होत्याचे न्हवते झाली आहेत. दोन दिवस उघडीप मिळाल्यानंतर पुन्हा बुधवारी पाऊस सुरू झाला. गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. आभाळ सतत भरून असल्याने अजून मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे.
या अखंड पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. सोयाबीनच्या शेंगा खराब झाल्या असून, कापसाची बोंडे काळवटली आहेत. यामुळे शेतकरी हतबल झाले असून, शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे.
ऑगस्ट महिन्यापासून वारंवार झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे बियाणे, खत, फवारणीवरचे पैसे वाया गेले आहेत. नदी–नाल्याकाठीच्या शेतात पूर वाहून गेला असून, बांध फुटले आहेत. अनेक ठिकाणी शेतं ओस पडली असू...

