पत्रकाराला बेदम मारहाण झाल्याची खोटी अफवा प्रसारित करणार्यावर कारवाई करा -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। पत्रकार हा संविधानाचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारांच्या सामाजिक कार्यामुळे सविधान जिवंत आहे.भारताच्या इतिहासात पत्रकारांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यामुळे कानाकोपऱ्यातील गोष्टी जगापर्यंत माहित होत असतात.
ऐवढेच नाही तर गोर गरीबाच्या न्याय हक्कासाठी सर्वात सर्वप्रथम पञकारच असतात असे असतांना समाजातील काही समाज कंटक वृत्तीची जमात माञ पञकारावर नजर ठेवून त्यांना समाजात बदनाम करुण त्यांच्या मुसक्या अवळ्याचे काम करत असतात असाच काहीसा प्रकार माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील कैलास शंकरराव बेहेरे या इसमाने दि.२६ आॅगष्ट रोजी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केला आहे.त्यात त्याने 'काल वाई (बाजार)च्या एका पञकाराने बेदम मार खाल्ला'असा मजकुर ठाकून छायाचिञ जोडले होते.परंतु सदरील प्रकार हा पत्रकारांची प्रतिमा मलीन करण्याची असल्याने स्थानिकच्या पञकारांनी या...
