preventive measures : पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय
नांदेड| पावसाळा म्हणजे निसर्गाची देणगी असली तरी, या काळात दूषित पाण्यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता असते. सध्याच्या महिन्यांमध्ये, नांदेड जिल्ह्यात नागरिकांना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून सावध राहण्याचे आणि योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी केले आहे.
दूषित पाण्यामुळे होणारे सामान्य आजार : पावसाळ्यात दूषित पाणी पिण्यामुळे किंवा दूषित पाण्याच्या संपर्कात आल्याने खालील प्रमुख आजार होऊ शकतात :
• जुलाब आणि अतिसार (Diarrhea) : हा दूषित पाण्यामुळे होणारा सर्वात सामान्य आजार आहे.यात पोटात दुखणे, वारंवार शौचास जाणे आणि शरीरातील पाणी कमी होणे ही लक्षणे दिसतात.
• टायफॉईड (Typhoid) : साल्मोनेला टायफी (Salmonella Typhi) नावाच्या जिवाणूमुळे होणारा हा गंभीर आजार आहे. यात तीव्र ताप, डोकेदुखी, अशक्तपणा आणि पोटदुखीची लक्षणे दिसून येतात.
• कावीळ (...
