जल जीवन मिशन योजनेच्या कामा मुळे दाहा फुटाच्या रस्त्यांची झाली पाऊलवाट -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेचा राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभर कामांचा शुभारंभ केला, त्या अंतर्गत गुंडवळ येथे हि काम करण्यात आले.
दलीत वस्ती मध्ये असलेला दहा फुटाचा सीमेंट रस्ता फोडून पाईप टाकण्यात आले. परंतु संबंधित ठेकेदाराने फोडलेला रस्ता सपाट न करता मोठ- मोठे दगड ठेवल्याने हा रस्ता केवळ पायवाट झाला असून साधी बैलगाडी हि जात नसल्याने गावक-याना अडचनीचा सामना करावा लागत आहे. ह्या कडे संबंधित टक्केवारी मुळे दुर्लक्ष करीत असल्याचा गावकरीचा आरोप आहे.
तालुक्यात अनेक गावात जलजिवन मिशनअंतर्गत पाण्याची टाकी व पाईप लाईनचे काम करण्यात आले. पाईप लाईनचे काम करतांना लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सिमेंटचे रस्ते संबधित कंत्राटदाराने फोडले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना त्या फुटलेल्या...
