Animal husbandry is necessary : शेतकरी बांधवांनी पशुसंवर्धन करणे गरजेचे – जिल्हाधिकारी राऊत – NNL
नवीन नांदेड| पशुसंवर्धन हे महत्त्वाचे असुन शेतकरी बांधवांना शेतीच्या पर्याय म्हणून पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय महत्वाचा द्यायला हवे. पशुसंवर्धन पंधरवडा अंतर्गत आयोजित मोहिमेत आपल्या पशुधनांना आणून पशुपालक यांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. ते बाभुळगाव येथे आयोजित शिबीर मध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग, महाराष्ट्र शासन पशुधनाच्या संवर्धना करीता साजरा करुया 'पशुसंवर्धन पंधरवडा' दिनांक ०१ ते १५ ऑगस्ट २०२४ पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध पशुवैद्यकीय सेवा तसेच राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती पशुपालकांना व्हावी, या दृष्टीकोनातून 'पशुसंवर्धन पंधरवडा' नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथे साजरा करण्यात आला.
यावेळी प्रारंभी नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज ...
