Usmannagar : अवकाळी पावसाच्या विश्रांतीनंतर उस्माननगर परिसरात मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
उस्मानगर, माणिक भिसे। मागील पंधरवड्यातील अवकाळी पावसाच्या विश्रांती नंतर पेरणीपूर्वक खरीप हंगाम शेतीच्या मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात आले असून शेतकरी बी बियाणे खत मिळविण्यासाठी तयारीसाठी लागले आहेत बी बियाणे घेण्यासाठी विविध बँका व सेवा संस्थेकडे कर्ज मिळण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत.
गतवर्षी शेतकऱ्यांना पावसाने योग्य प्रमाणात दिली नसल्याने नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कडधान्य व सोयाबीन पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. कोरडवाहू जमिनीतील खरीपाची पिके ही पावसावर अवलंबून असतात. पावसाने साथ दिली तर खरीप हंगाम चांगला , आणि पावसाने दगा दिल्यास पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
यावर्षी उन्हाळा अधिक तापल्याने शेतकऱ्याने जमिनीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर व्दारे नांगरणी, कोळपणी, वखरणी उपयोग सुरू केला .त्याच दरम्यान अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने शेत...
