Crops Damaged : राज्यात अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान – कृषी मंत्री दत्तात्रय भरणें
नांदेड| कृषी मंत्री दत्तात्रय भरणें यांनी नांदेड जिल्ह्यात भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. सोयाबीन, तूर, कपाशी यासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली. यां नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन भरणें यांनी दिलं.
"नांदेड जिल्हा अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात १०० नुकसान भरपाई मिळवणारा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १०० टक्के मदत निधी मंजुर करण्यात आला आहे. शासनाने तिसऱ्या टप्यात नांदेडसाठी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा निधी मंजुर केला आहे. तर खरडून गेलेल्या व गाळयुक्त जमिनींसाठी २० कोटी ८१ लाखांचा निधी दिला जाणार आहे....
