Wednesday, May 13

Tag: by unknown persons; Damage is estimated

A cloud of soybeans : शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचा ढग अज्ञातांनी जाळून टाकलं; अंदाजे दीड लाखाच नुकसान -NNL

A cloud of soybeans : शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचा ढग अज्ञातांनी जाळून टाकलं; अंदाजे दीड लाखाच नुकसान -NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे टेम्भी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील तीन बैग सोयाबीन चा ढग कुणीतरी अज्ञातांनी जाळून टाकला आहे. ही घटना दिनांक 14 ऑक्टोंबर सोमवार रात्री 12 च्या दरम्यान घडली. यामुळे शेतकऱ्यांच दीड लाखाचे नुकसान झाले आहे. या संदर्भात महिला शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यंदा निसर्गाच्या दृष्ठ चक्राने शेतकरी हवालदिल झाला असताना उर्वरित सोयाबीन काढून ठेवला. दरम्यान कुणीतरी अज्ञातांनी शेतातील तीन बॅग सोयाबीनचा ढग मध्यरात्रीच्या वेळी जाळून टाकून नुकसान केले आहे. अशी पोस्ट शेतकऱ्याचा मुलगा लक्ष्मण मारुती टेकाळे टेंभीकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून नीच प्रवृत्तीच्या गावातील लोकांनी, सोयाबीन जाळून टाकला असल्याचा आरोप केला आहे. तीन बैग मध्ये 27/28 क्विंटल सोयाबीन होईल असा अंदाज होता असा एकूण अंदाजे 1,50,000/- रुपयाची ...
error: Content is protected !!