Journalists attacked : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कठोर कारवाईची पत्रकार संरक्षण समितीची मागणी
देगलूर, गंगाधर मठवाले| त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ, पत्रकार संरक्षण समिती देगलूरच्या वतीने करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. या हल्ल्यातील सर्व दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२० सप्टेंबर २०२५ रोजी 'झी २४ तास'चे ब्युरो चीफ योगेश खरे, 'साम टीव्ही'चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि 'पुढारी न्यूज'चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला. या हल्ल्यात ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा हल्ला म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला आघात आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या घटनेमुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, तसे...
