Case of file ; अखेर आठ महिन्या नंतर मुलाच्या मारेकऱ्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल -NNL
नांदेड। म्हणतातना लढणारे माणसं हे जिवंत असल्याची नोंद होते, नाहीतर मुर्दाड बॉयलर कोंबड्यात आणि अन्याय सहन करणाऱ्यात फारसा फरक नसतो. गोष्ट आहे नांदेड जवळील शेनी पोस्ट देळूब ता.अर्धापूर येथील.
ऋतुराज संजय हातागळे या १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा २० एप्रिल २०२४ रोजी चोरंबा- निमगाव कॅनॉल मध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
पोलीस ठाणे अर्धापूर येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती व पार्थिवास अग्नी देऊन अंत्यविधी उरकण्यात आला होता. परंतु मयताची आई सुनीता हातागळे यांना आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा पूर्ण संशय होता. तशी तक्रार सुनिता आणि संजय हातागळे यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात देण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु निमगाव आरोग्य उप केंद्राच्या डॉक्टरांनी व्हेन्स मध्ये पाणी जाऊन मृत्यू झाल्याचे शव विच्छेदन अहवालात स्पष्ट लिहले होते.
पोलिसांनी देखील रिस्क न घेत...
