उस्माननगर l कंधार तालुक्यातील बामणी (पक) येथील दिवंगत स्वातंत्र्य सेनानी गुणाजी नागोजी पाटील कदम यांचे जेष्ठ पुत्र माजी सरपंच खंडोजी गुणाजी पाटील कदम वय 95 वर्ष यांचे दि.8 ऑगस्ट 2025 रोज शुक्रवारी सकाळी-11:00 वाजता वृद्धा पकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी-11:00 वाजता जन्मभूमी बामणी (पक) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कै.खंडोजी पाटील कदम हे जेजुरीच्या खंडोबारायाचे निश्चिम भक्त होते, तसेच ते शांत, संयमी, प्रेमळ व निर्व्यसनी नागरिक म्हणून ते परिचित होते.


त्यांचे पश्चात- पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातू असा मोठा परिवार आहे. ते नागोजी कदम (शिक्षक), गंगाधर कदम (शिक्षक), यांचे चुलते तर मालोजी कदम, पांडुरंग कदम यांचे वडील व गावच्या विद्यमान उपसरपंच संगीता मालोजी कदम यांचे सासरे होत.


